
पुणे:
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराला पुन्हा एकदा ‘कोयता गँग’च्या दहशतीने ग्रासले आहे. आज दुपारी १२ वीची बोर्डाची परीक्षा देऊन बाहेर पडणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्यावर कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ कॉलेजच्या गेटवरच कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या भीषण घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?
१२ वीचा विद्यार्थी शंकर मिरगणे हा आज आपला पेपर संपवून आनंदाने कॉलेजच्या बाहेर पडत होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी शंकरवर कोयत्याने हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की कॉलेजच्या परिसरात एकच पळापळ झाली. शंकर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाचा धाक संपलाय का?
दिवसाढवळ्या, तेही कॉलेजच्या परिसरात आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना असा हल्ला होणे, हे पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
- कोयता गँगची दहशत कधी थांबणार?
- विद्यार्थी आता कॉलेजमध्येही सुरक्षित नाहीत का?
- पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक उरला नाहीये का?
