अन्न प्रक्रिया नवोपक्रमांना नवा वेग

पुणे : अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी जेबीटी मरेलने भारतात आपल्या जागतिक उत्पादन केंद्राचे (GPC) भव्य उद्घाटन केले.
मावळ तालुक्यातील विवान कोहली इंडस्ट्रियल इस्टेट, नायगाव येथे उभारलेल्या या अत्याधुनिक केंद्रामुळे भारतीय तसेच आशिया-पॅसिफिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे उपाय उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यासाठी कंपनीचे सीईओ ब्रायन डेक, क्षेत्र आणि एकत्रीकरण विभागाचे अध्यक्ष ऑगस्टो रिझोलो, उपाध्यक्ष बॉब पेट्री आणि जॅक मार्टिन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या जीपीसीद्वारे आधुनिक उत्पादन क्षमता वाढवणे, कार्यक्षम व शाश्वत अन्न प्रक्रिया उपाय उपलब्ध करून देणे आणि भारताला आशियाई निर्यातीचे केंद्र म्हणून बळकटी देणे हा कंपनीचा उद्देश आहे.

समारंभात बोलताना ऑगस्टो रिझोलो म्हणाले,
“भारतातील हे जागतिक उत्पादन केंद्र आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. यामुळे नवोपक्रम आणि शाश्वततेच्या दिशेने आमचा प्रवास आणखी वेगवान होईल. भारत आता केवळ दक्षिण आशियासाठीच नाही तर संपूर्ण आशियाई प्रदेशासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे.”

भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग देशाच्या जीडीपीत सुमारे १२ टक्के योगदान देतो आणि ८० लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. वाढती पॅकबंद व रेडी-टू-ईट अन्नपदार्थांची मागणी, मेक इन इंडिया उपक्रम आणि पीएलआय योजना यामुळे या उद्योगात गुंतवणुकीच्या व नवोपक्रमाच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत.

जेबीटी मरेलचे हे नवीन केंद्र भारताला “अन्न प्रक्रियेतील जागतिक नवोपक्रम केंद्र” बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरत आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »